मुख्य बातम्या

कलाकारांची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही किरण माने यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीरपणे उभी राहणार

कलाकारांची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही
किरण माने यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीरपणे उभी राहणार

अभिनेते किरण माने यांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून काढले आहे. या झुंडशाहीविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपट, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मांडले आहे.

किरण माने यांनी यापुढे स्वतःला एकटे समजू नये, त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस व संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असे ते म्हणाले. किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने सन्मानाने परत मालिकेत घ्यावे अन्यथा मुलगी झाली हो या मालिकेचे पुढील भाग चित्रीत होऊ देणार नाही, असा इशाराही बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

शरद पोंक्षे, आरोही वेलणकर, कंगना राणावत, अनुपम खेर यांच्यासारखे कलाकार उघड-उघड भाजप समर्थनार्थ आपले मत मांडत असतात. अशावेळी त्यांना चित्रपट किंवा नाटकातून काढण्यात येत नाही. याउलट त्यांना पद्मश्री, एफटीआय मधील मोठी लाभाची पदे देऊन सन्मानित केले जाते. मात्र दिल्लीतील शेतकरी आंदोलन वा इतर सामाजिक आंदोलनांवर भाष्य केल्यानंतर किरण मानेंसारख्या एका हरहुन्नरी कलाकाराला अशी वागणूक दिली जाते हे अशोभनीय आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यांनी काय बोलावे, काय लिहावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशा वेळी कुठलीही वाहिनी वा कंपनीने कलाकारांच्या वैयक्तिक जीवनातील मतप्रवाहांचे राजकारण करून एखाद्या कलाकाराची उपजीविका हिरावून घेणे, ही बाब अन्यायकारक व निंदनीय आहे. सांस्कृतिक क्षेत्र हे जनजागृतीचे एक उत्तम माध्यम आहे. अशावेळी प्रत्येक कलावंताची किंवा प्रत्येक व्यक्तीची मते वेगळी असू शकतात. त्याच्या वैयक्तिक मतासाठी अशा प्रकारचे कृत्य करणे म्हणजे हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आहे, असे मत बाबासाहेब पाटील यांनी मांडले आहे.

 

Most Popular

To Top