नागपूर– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अट्टाहासामुळेच अधिवेशन कामकाज खोळंबलय, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुसळधार पावसामुळे नागपुरमध्ये पाणी साचलं होतं. विधीमंडळही तुंबलं होतं. त्यामुळे विज पुरवठा खंडीत करून अधिवेशानाच्या कामाला दिवसभर स्थगिती देण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला.
दरम्यान, पावसाळी अधिवेशन नागपुरला घेऊ नका, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांना दिल्याचा दावा मुंडेंनी केला आहे.
![](https://www.mahasatta.com/wp-content/uploads/2023/01/mahasattalogo.png)