मुंबई– आज उदयनराजे यांनी मंत्रालयात येवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह मंत्री गिरीष महाजन व चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या दालनात जावून त्यांची भेट घेतली.त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढता विरोध पाहता उदयनराजे यांनीही पलटवार करण्याची खेळी सुरू केल्याचे संकेत आज दिले आहेत
मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी या भेटीगाठी असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. मात्र, आजपर्यंत कामांसाठी मंत्रालयाची पायरी न चढणाऱ्या उदयनराजे यांनी आज मंत्र्याच्या दालनात जावून भेटी घेतल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
सातारा लोकसभेत उदयनराजे यांची आगामी निवडणूक कोणत्या चिन्हावर होणार याची चर्चा रंगली असतानाच त्यांनी मंत्रालयात येवून मुख्यमंत्र्याची चर्चा केल्याने राष्ट्रवादीतला पक्षांतर्गत कलह वाढीस लागण्याचे संकेत आहे.
![](https://www.mahasatta.com/wp-content/uploads/2023/01/mahasattalogo.png)