By
Posted on
महासत्ता , नवी दिल्ली
शेतकऱ्यांना कर्जमाफी नको म्हणत टीकेच्या धनी ठरलेल्या स्टेट बँक प्रमुख अरुंधती भट्टाचार्य पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. एकिकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करणाऱ्या भट्टाचार्यांनी दुसरीकडे मात्र टेलिकॉम सेक्टरकरता 4 लाख कोटी बेलआऊट पॅकेजची मागणी केली आहे.
त्यामुळे त्यांच्या या दुटप्पी भूमिकेला शेतकऱ्यांसह अनेक शेतकरी नेत्यांनी तीव्र शब्दांत विरोध दर्शवला आहे. भट्टाचार्यांच्या मागणीवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
