By
Posted on
अहमदनगर | शेतकऱ्यांचा संप आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. किसान क्रांती मोर्चाच्या कोअर टीमची नगरमध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ५ जूनला महाराष्ट्र बंद, ६ जूनला जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांसह सर्व सरकारी कार्यालयांना टाळं, तर ७ जूनला राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कार्यालयांना टाळं ठोकण्यात येणार आहे.
