देश -विदेश

देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर कर्जमाफीमुळे विपरीत परिणाम होईल – उर्जित पटेल

देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर कर्जमाफीमुळे विपरीत परिणाम होईल – उर्जित पटेल

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी कर्जमाफीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. उर्जित पटेल यांनी हे विधान राज्यातील शेतकऱ्यांचा संप आणि मध्य प्रदेशाच्या मंदसौरमध्ये सहा शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर केले आहे.

आरबीआय गव्हर्नर मुंबईत आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, अर्थव्यवस्थेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे फटका बसेल. शिवाय कर्जमाफीमुळे मागील दोन वर्षात वित्तीय तूट कमी करण्यासाठी जे प्रयत्न केले, ते वाया जातील. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु आहे. पण मध्य प्रदेशातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. पाच शेतकऱ्यांचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. पण कर्जमाफीचा निर्णय विचारपूर्वक करावा, असेही उर्जित पटेल म्हणाले.

देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर कर्जमाफीमुळे विपरीत परिणाम होईल – उर्जित पटेल
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top